
अमळनेर : मुंबईवर आतंकवाद्यांनी २६/११ रोजी केलेल्या भ्याड हल्ल्यात अनेक जवान व अधिकारी शहीद झाले. याची आठवण म्हणून २६/११ ला शहीद दिन पाळण्यात येतो. या पार्श्वभूमीवर अमळनेर शहर व तालुका काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी जिल्हा परिषदेच्या सदस्या जयश्री अनिल पाटील, शांताराम बापू पाटील, विनोद भैय्या पाटील, मुन्ना शर्मा, संदीप मल्हारी पाटील, सुलोचना वाघ, वसुंधरा लांडगे, धनगर दला पाटील, प्रविण जैन, रज्जाक शेख, मोहन सातपुते, विश्वनाथ ठाकरे, सईद तेली, देविदास देसले, नितीन भदाणे, अहमद पठाण, जुबेर पठाण, गोविंदा बाविस्कर, अझर पठाण आदी उपस्थित होते.